कोल्हापूर – राधानगरी धरण पावसामुळे १०० टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस असल्याने धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरणातून एकूण ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदी ही ४० फूट ५ इंचांवरून वाहत असून जिल्ह्यातील ८० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर २८ गावातील शाळांना आज पासून सुट्टी दिली आहे.