pune – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता १० वी (दहावी) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात ९८.८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात ९०.७८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दहावीच्या परीक्षेतही यंदा नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. यंदा राज्यात ९६.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ९२.३१ इतकी आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी
कोकण : ९९.८२ टक्के
मुंबई : ९५.८४ टक्के
पुणे : ९४.८१ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.८२ टक्के
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
अमरावती : ९२.९५ टक्के
नाशिक : ९३.०४ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के