मुंबईत ‘या’ तारखेपासून पाणी कपात…

Published:

मुंबई – मुंबईत गुरुवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page