बारावीचा निकाल जाहीर…

Published:

मुंबई –  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे.

त्यासोबतच बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. 

विभागनिहाय निकाल

कोकण – 96.01

पुणे – 93.34

कोल्हापूर – 93.28

अमरावती – 92.75

औरंगाबाद – 91.85

नाशिक – 91.66

लातूर  – 90.37

नागपूर – 90.35

मुंबई – 88.13

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page